पंढरपूर प्रतिनिधी --
शहरातील वीर सावरकर चौक व आमदार भाई राऊळ चौकात हायमास्ट लाईट बसविण्याची मागणी अ. भा.ग्राहक पंचायतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
शहरातील विविध चौकात हायमास्ट लाईट बसविले आहेत मात्र अत्यंत रहदारीच्या वीर सावरकर चौकात व तुळशी वृंदावन, यमाई तलाव ट्रॅक,रेल्वे स्टेशन,गणेशनगर,लक्ष्मीटाकळीकडे जाणाऱ्या, तालुका पोलीस स्टेशन, तहसील,पंचायत समिती इ. कार्यालयाकडे जाणाऱ्या आमदार भाई राऊळ चौकात लख्ख प्रकाशाची गरज असताना अद्याप तेथे हायमास्ट लाईट बसविलेले नाहीत. त्यामुळे अत्यंत गर्दीच्या ठिकाणी पुरेसा उजेड नाही ही वस्तुस्थिती आहे. तेथील मोठ्या वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन तेथे प्राधान्याने हायमास्ट लाईट बसविण्याची गरज आहे.
वाहनधारक,पादचारी यांना जीव मुठीत धरून चौक ओलांडवे लागतात.त्यामुळे अपघातानंतर व्यवस्था करण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतली जावी अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,जिल्हा संघटक दीपक इरकल,जिल्हा सचिव सुहास निकते, सदस्य अण्णा ऐतवाडकर,संतोष उपाध्ये, पंढरपूर तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, संघटक महेश भोसले, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, प्रा.धनंजय पंधे,आझाद अल्लापूरकर, सदस्य सागर शिंदे,संजय खंडेलवाल,सतिश निपाणकर,अंकुश वाघमारे,शाम तापडिया,इंद्रजित फडे यांनी व्यक्त केली आहे.
Tags
सामाजिक वार्ता