सातारा प्रतिनिधी -- समिक्षा वृत्त
*दक्षिण भारतीय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, २०२५ मध्ये आर आर फिल्म निर्मित, व श्री. राहुल वेदपाठक, दिग्दर्शित, शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या भटक्या जातीतील मुलांविषयी"* *"इस्ताऱ्या"*
ग्रामीण कलाकारांना घेऊन केलेल्या या लघुपटाची निवड झाली, व या *लघुपटास उत्कृष्ट दिग्दर्शन उत्कृष्ट कथेचे मानांकन मिळाले* *त्यांचे खूप खूप अभिनंदन....*
*यापूर्वीच या फिल्मचे समीक्षण करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.*
*शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांच्या जीवनावरील शॉर्ट फिल्म..*
* *इस्ताऱ्या.....*
*लेखक, पटकथा, संवाद, दिग्दर्शन*
*श्री. राहुल वेदपाठक*
*समीक्षा....*
*आजच्या भारतीय समाजात गरीब आणि श्रीमंत हे दोन वर्ग आहेतच,* सामान्य जनतेच्या अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत, अशा समाजामध्ये समृद्धी बरोबरच, संस्कृती, ही बोलायला हवी होती पण तसे दिसत नाही, पण दुर्दैवाने खेडीच ओस पडू लागली आहेत, आणि लोकांचा कल शहराकडे वाढलेला आहे. *ग्रामीण जीवनात शिक्षणाची दशा, तशीच आहे, अनेक भटक्या विमुक्त जाती जमातीतील मुले शिक्षणापासून वंचित आहेत, यामध्ये डोंबारी, गारुडी, अंग मेहनतीची कसरती करून दाखवणारी कुटुंब, गरीब दलित समाज, ऊस तोडणी कामगारांची मुले, शिक्षणापासून वंचितच आहेत.*
*कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले, गोरगरिबांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी कमवा व शिका या माध्यमातून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, खूप मोठे परिवर्तन घडवून आले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, यांनी बहुजन समाजाच्या उन्नती साठी प्रयत्न केले,*
*गरीब कुटुंबीयांना उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने त्या कुटुंबातील मुले शाळेत न जाता गावातच पडेल ती कामे हॉटेलमध्ये वेटर, गवंड्याच्या हाताखाली, इत्यादी कामे करू लागले, शिक्षणापासून वंचित राहिली, हाच मुद्दा लक्षात घेऊन ग्रामीण लेखक, दिग्दर्शक, श्री राहुल वेदपाठक यांनी इस्ताऱ्या नावाची ग्रामीण कलाकारांना घेऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा, शिक्षण प्रणालीवर नवा प्रकाश टाकला, पुन्हा एकदा शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले,* यामधील
शिक्षणापासून वंचित राहिलेला इस्ताऱ्या नावाचा मुलगा रंगवताना त्याची शिक्षणासाठी खूप धडपड असते, परंतु घरची परिस्थिती गरिबीची असल्याने, वडील हे अशिक्षित अपंग असल्याने, व आईचे कृपा छत्र हरपले असल्याने, रोजचा पोटापाण्याचा प्रश्न असल्याने, वडील बिर्या हे अपंग असल्याने, त्यांना कोणतेही काम होत नसल्याने, पोरांनाच गावातील छोटे मोठी कामाला लावत, तसेच शाळेत न पाठवता, त्याला नदीवर मासे धरायला लावत, व त्यांच्या विक्रीतून दिवसाचा पोटा पाण्याचा प्रश्न मिटवत, परंतु इस्ताऱ्याला शिक्षणाची आवड असल्याने, तो शिक्षणासाठी हट्ट धरत, पण वडील शाळेत जायचं नाय म्हजी नाय ! म्हणून त्याला कामावर हाकलत
*मंगी ..*
इस्तऱ्याची मोठी बहीण, तिलाही शिक्षणाची आवड होती, पण बा न तिलाही शाळा शिकू दिली नाय, लवकरच आई वारली असल्याने तिलाच आई म्हणून घरातील कामे करावयास लागत, इस्ताऱ्याला शाळा शिकू देण्यासाठी तिची खूप तळमळ, पण बा तयार होत नसत, मंगे तू तुझी कामं कर, हो घरात म्हणून बा सारखा रागावत.
एक दिवस गावात इस्ताऱ्याची व मास्तरची गाठ पडली, मास्तर मला शिकायचयं, मास्तरांनी त्याला शिकवण्याची तयारी दर्शवली, पण बा शाळेत लावत नाय!, म्हणून मास्तरांनी त्याला घरीच फळा दिला, व त्याला अक्षर ओळख दिली व मंगीला ही शिकवण्याची तयारी दर्शवली,दोघे रोज सराव करू लागली, एक दिवस बा न सपराला अडकवलेला फळा बघितला, मंगीला विचारले, हा कोणी दिला, शाळा शिकायची नाय! म्हणून त्याने फळा काढून फेकून दिला, इस्तऱ्याने फळा उचलला मला शाळा शिकायची हाय, बा म्हनाला शाळा शिकायची नाय मजी नाय, शाळा शिकायची असेल तर घरात थांबायचं नाय,, मंगी बोलली अरे बा मला नाही तर त्याला तरी शाळा शिकू दी की, मंगे तू आत हो म्हणून बा दरडावला, नाही थांबत म्हणून इस्तरीने फळा उचलला वाट दिसेल तिकडे जाऊ लागला,
माळावर जाऊन बसला, रस्त्यातून जाणारे रामज्याने त्याला हाक मारली ऐ इस्ताऱ्या, मला शाळा शिकायचीय, कशाची शाळा शिकतूयास, बस गाडीव, म्हणून त्याला वाचनाचे महत्त्व पटवण्याची पोस्टर लावायला गावातून फिरवले, व त्याला शंभर रुपये दिले, अशी गावातील पडेल ती कामे करायला गावातील लोक त्याला हाका मारीत एक दिवस शिवा, व रामा, हे गावातील भुरटे चोर, लहान मोठ्या चोऱ्या करीत, त्यांनी गावातीलच मंदिरातील देवाचे सोने चोरण्याचे ठरविले, व इस्ताऱ्याला शंभर रुपये व कपडे घेतो, म्हणून आमिष दाखवून त्याला चोरी करायला लावली, चोर पकडले गेले, इस्तऱ्याच्या वयाचा विचार करता त्याला बाल गुन्हेगार म्हणून सोडून दिले, व त्याच्या वडिलांना व रामज्याला त्याला शाळेत घालण्याची पोलिसांनी सूचना केली.
रामजाने त्याला मास्तरांची हवाली केले, व त्याच्या शिक्षणाची सोय करून दिली.
अशाप्रकारे *शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी व शिक्षणापासून वंचित राहणारी मुले कोणत्या मार्गाला लागतात, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी शॉर्ट फिल्म, खरोखरच चिंतन करायला लावणारी आहे.*
*श्री. राहुल वेदपाठक, यांनी अत्यंत मार्मिकपणे व शिक्षणाचा सखोल अभ्यास करून हे दिशादर्शक शॉर्ट फिल्म तयार करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.*
*ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन, अत्यंत सुंदर असे कलाकृती "इस्ताऱ्या" ह्या शॉर्ट फिल्म मधून दिसून येते, कसलेही कलेचे प्रशिक्षण नसताना, ग्रामीण कलाकारांनी अत्यंत जीव ओतुन काम केल्याने, सुंदर कलाकृतीची निर्मिती झाली.*
सर्व ग्रामीण कलाकाराचे पुन्हा एकदा आभार.
*शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, "ग्रामीण शिक्षणाचे वास्तव" विदारक वस्तुस्थितीचे कथन करणारी ही शॉर्ट फिल्म बघण्यासारखी आहे, शंभर टक्के गुणवतेस पात्र असलेली, महाराष्ट्रातून तिची प्रशंसा होत असलेली, तिची ऑस्कर साठी निवड व्हावी व तिला अनेक शिक्षण, सिने क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त होवोत, ही ईश्वरचरणी प्रार्थना, लेखक, पटकथा, संवाद, दिग्दर्शक, श्री. राहुल वेदपाठक यांना शुभ आशीर्वाद. व अशीच आपल्याहातून कलाकृतींची निर्मिती होवो, ही शुभेच्छा.*💐💐💐💐🙏🏻
*इस्ताऱ्या*
*लेखक, पटकथा, संवाद, दिग्दर्शन,*
*श्री. राहुल वेदपाठक*
*कासेगाव,ता. वाळवा जि. सांगली*
*फो. ९३०७९९९२६९*
*समीक्षक....*
*श्री रविंद्र परशुराम वेदपाठक* *बी.कॉम. जी.डी.सी. अँड ए (कॉम्प्युटर )साखरवाडी ता. फलटण जि. सातारा.*
*फो.९९७०७४९१७७*
Tags
सामाजिक वार्ता