फसवणुक झालेल्या ऊस वाहतुकदारांसाठी सहकार शिरोमणी चा महत्वाचा निर्णय...

सहकार शिरोमणी कारखान्याकडे रितसर करार केलेल्या मात्र फसवणुक होवुन, टोळी पळुन गेलेल्या वाहन मालकांनी तातडीने शेती विभागाशी संपर्क साधावा 

भाळवणी :- प्रतिनिधी 
सध्या जिल्यातील सर्व साखर कारखान्याचे धुराडे पेटले असून, मोठ्या प्रमाणावर ऊसाचे गाळप सुरु आहे. मात्र गाळप हंगाम चालु होवुनही बऱ्याच वाहतुकदारांच्या टोळ्या हजर झालेल्या नाहीत. ऊस वाहतुकदारांकडून लाखों रुपयांचे उचल ऊस टोळी मुकादमांनी घेतलेली आहे. मात्र ॲडव्हान्स घेवुनही टोळी कामावर हजर न केल्यामुळे अनेक वाहनमालकांची फसवणुक झाली आहे. सहकार शिरोमणी कारखान्याकडील अशा फसवणुक झालेल्या वाहनमालकांनी मा.चेअरमनसाहेब यांचेकडे अडचणी सांगितलेवरुन सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर दि.05/11/2022 रोजी चेअरमन मा.श्री.कल्याण वसंतराव काळे यांचे अध्यक्षतेखाली मा.संचालक मंडळ, वाहन मालक, अधिकारी व कारखान्याचे कायदेशिर सल्लागार ॲङ राजेश भादुले, ॲङ सतिश झिरपे यांचे समवेत बैठक घेण्यात आली.
       सदर बैठकीमध्ये ज्या वाहन मालकाची टोळी न आल्यामुळे फसवणुक झालेली आहे. अशा वाहन मालकांनी कारखान्याचे शेती विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करणेत यावी. जेणेकरुन संबंधित टोळी मुकादमावर योग्य ती कायदेशिर कारवाई करणे सोईचे होईल. असा निर्णय घेण्यात आला. त्याकरीता कायदेशिर कारवाई करणेकामी येणारा आर्थिक खर्च, वकिलामार्फत सर्व मार्गदर्शन व सल्ला व सहकार्य कारखान्यामार्फत करण्यात येणार आहे. वाहन मालकावर कोणतीही तोशिष येणार नाही. त्यामुळे सर्व फसवणुक झालेल्या वाहतुकदारांना दिलासा मिळाला आहे.
      तरी सहकार शिरोमणी कारखान्याकडे रितसर करार केलेल्या मात्र फसवणुक होवुन, टोळी पळुन गेलेल्या वाहन मालकांनी तातडीने शेती विभागाशी संपर्क साधुन आवश्यकत्या कागदपत्रांची पुर्तता करणेचे  आवाहन कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form