सरांनी आपल्या बौद्धिक कौशल्याने जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाने करून सोडावे सकल जन या समर्थांच्या उक्ती नुसार तावशी ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शिकेल तो टिकेल हा सिद्धांत सरांनी प्रथमतः ओळखून त्यांनी शिक्षणासाठी व ग्रामस्थांच्या पुढील पिढ्या अशिक्षित न राहता सर्वांना शिक्षणाचे महत्त्व कळावे यासाठी त्यांनी तावशी नगरी १९६५साली साधना विद्यालयाची स्थापना केली.
पवित्र ते कुळ
पावन तो देश
जेथे हरीचे दास
जन्म घेती
श्रीक्षेत्र पंढरपूर तालुक्यातील नजीकच्या तावशी या ग्रामदैवत खंडोबाच्या पवित्र भूमीत पाटील घराण्यात आदरणीय श्री कल्याणराव पाटील सर यांचा जन्म झाला. तावशी गावातच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी शिक्षण घेणं हे फार जिकिरीचे काम होते म्हणजे सर्वत्र अशिक्षित माणसेच जास्त होती. शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणाकडेही नव्हता त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचाराचा वारसा जोपासणारे व समाजकार्य हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून तावशी सारख्या दुर्लक्षित गावाकडे त्यांनी स्वतःच्या कुटुंबाची परिवाराची प्रपंचाची कोणतीही परवा न करता माझ्या गावातील प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षण घेतल्याशिवाय समृद्ध होणार नाही या ध्याने 1965 साली साधना विद्यालय या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि त्याचे आजपर्यंत जोपासना त्यांनी केली तावशी या दुर्गम खेडेगावी येथे पाटील सर राहत होते. लहानपणापासूनच समाजकार्याची आवड त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचे फार मोठे योगदान त्यांनी दिले पाटील सर यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ होती. आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर पाटील सरांनी आपला शिक्षण क्षेत्रातील वेगळा व मानाचा ठसा उठविला. सरांनी आपल्या बौद्धिक कौशल्याने जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाने करून सोडावे सकल जन या समर्थांच्या उक्ती नुसार तावशी ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शिकेल तो टिकेल हा सिद्धांत सरांनी प्रथमतः ओळखून त्यांनी शिक्षणासाठी व ग्रामस्थांच्या पुढील पिढ्या अशिक्षित न राहता सर्वांना शिक्षणाचे महत्त्व कळावे यासाठी त्यांनी तावशी नगरी साधना विद्यालयाची स्थापना केली.श्री कल्याणराव पाटील सर यांची घरची परिस्थिती त्या काळी बेताचीच होती. शेतकरी कुटुंबातील हे घराणे आपला शेतीचा व्यवसाय करीत करीत शिक्षणाकडे वळले. वडिलोपार्जित शेत जमीन कसत सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले.सरांनी त्याकाळी साधना विद्यालयात घरोघरी फिरून शिक्षणाचे महत्त्व सर्वांना पटवून सांगत विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तावशी व आसपासच्या खेडेगावात सायकलवर फिरुण विद्यार्थी जमविले.
त्याकाळी विद्यालय सुरू करायचे म्हणजे अशक्य गोष्टच होती परंतु सरांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर साधना विद्यालयाची स्थापना केली. त्याकाळी खेडेगावात कोणतीही सरकारी मदत नसल्याने सरांनी आपल्या पगारातील काही रक्कम व ग्रामस्थांच्या कडून आर्थिक मदत घेऊन साधना विद्यालयाची स्थापना केली.श्री कल्याणराव पाटील सरांची विशेष गोष्ट सांगायची झाली तर त्यांनी घेतलेल्या शिक्षणाची व करीत असलेल्या शैक्षणिक सेवेची त्यांनी कधीच बडेजावी मिरवली नाही.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्व समाज जसे वागतात तसेच सरांचे वागणे होते. सरांचा स्वभाव म्हणजे साधी राहणी व उच्च विचारसरणी असा होता. त्यांच्या या स्वभावामुळे ग्रामस्थांच्या मनात सरांचे बद्दल नितांत आदर होता. सरांची बोलीभाषा इतकी रसाळ व मृदू होती की त्यातून कधीही अहंकार कोणालाही जाणवला नाही. त्यांच्या या सर्व गुणांमुळे सरांच्या पाठीशी सर्व ग्रामस्थ उभे राहिले. सरांनी सर्वांच्या सहकार्य तून तावशी या खेडेगावी साधना विद्यालय ची सुरुवात केली.त्याकाळी उच्च शिक्षण घेतलेल्या श्री पाटील सरांना वाचनाची फार आवड होती. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे त्यांनी सामाजिक, राजकीय धार्मिक ,सांस्कृतिक कथा कादंबऱ्या कविता संग्रह वर्तमानपत्रे आदींच्या नित्य वाचनाने त्यांनी आपली जीवनशैली सुधारली. वाचनाच्या अखंड आवडीमुळे सर आजही रोज नित्यनेमाने वाचन करीत असतात त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाटील सर हे आपले जिवाभावाचे वाटतात. कोणाच्याही कुटुंबातील कलह पाटील सर आपल्या मृदू व रसाळ शैलीतून सोडवीत असत.त्या कालच्या परिस्थितीत सरांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व समजाविले.
पाटील सरांनी आपल्या आयुष्यात फार चढ-उतार बघितले. त्यांच्यावर आलेल्या अनेक संकटावर त्यांनी मात केली. आलेल्या संकटावर न घाबरता न डगमगता ते सामोरे गेले. अशाही परिस्थितीत त्यांनी शिक्षण क्षेत्रावर व अध्यापनावर त्याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. सरांनी आपल्या जीवनात शेकडो विद्यार्थी तयार केले. विद्यार्थ्यांना रुचेल पटेल पचेल अशा सोप्या व सरळ भाषेत त्यांनी जीवनभर ज्ञानार्जन केले. आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे सरांनी दिले त्यामुळे अल्पावधीतच श्री पाटील सर सर्वांचे लाडके शिक्षक म्हणून प्रसिद्धीस आले.श्री पाटील सर आज 87 वर्षे पूर्ण करून 88 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचे कडे पाहून कोणीही म्हणणार नाही सर एवढे पोक्त वाटतात. तरुणांनाही लाजवेल असे व्यक्तिमत्त्व सरांनी आजही झोपले आहे. सर अजूनही काटक व आपली कामे आपणच करतात. सर आजही सायकलवर चार ते पाच किमी प्रवास करतात. एखाद्या तरुणालाही लाजवेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आजही असेच दिसते.
श्री पाटील सरांनी कर्मकांडांवर आपला विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व गोष्टींचा अभ्यास करून समाज प्रबोधन केले. समाजातील वाईट गोष्टींचा सरांनी प्रकर्षाने विरोध केला. सरांनी समाजातील श्रद्धेला तिढा न देता अंधश्रद्धेवर प्रहार केला. समाजात एकीचे महत्त्व, शिक्षण पद्धती कशी श्रेयस्कर होईल यासाठी सरांनी आपल्या आयुष्य वेचले.पाटील सरांनी आपल्या जीवनात अनेकांना मदतीचा हात दिला. वयाच्या 88 व्या वर्षी जरी थोडी दृष्टी कमी झाली असली तरी सर मनाने चिरतरुण वाटतात. आज पर्यंत त्यांनी केलेल्या कार्याला दंडवत प्रणाम......
आज श्री कल्याणराव पाटील सर हे 88 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही अल्पशी शब्द सेवा समर्पित करतो.
- रामकृष्ण बिडकर
या निमित्ताने उपस्थित साधना विद्यालय विद्यार्थी,विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवसाच्या सोहळा अनुभवला.