तब्बल ७० दिवस १४ टँकरचे माध्यमातून सुरू होते पाणीवाटप
मोहोळ प्रतिनिधी---
आज दुष्काळात पाणी विकून पैसे कमावणाऱ्यांचे उदंड पीक आलेले असताना मोहोळ तालुक्यात वाड्या वस्त्यावरील नागरिकांचे पिण्याचे पाण्यासाठी सुरू असणारी भटकंती लक्षात घेत उद्योजक राजाभाऊ खरे या जलदुताने मोफत पाणीसेवा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. तब्बल ७० दिवसापासून चौदा टँकरच्या माध्यमातून उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील वाड्या वस्त्यावरील सर्वसामान्य जनतेला मोफत पाणीपुरवठा केला. मागील चार दिवसापासून वरूण राजाच्या कृपेने पावसाने या भागात दमदार हजेरी दिल्याने या परिसरात बोरवेल तसेच पिण्याच्या पाण्याचा साठा झाल्याने आज दिनांक 13 जून रोजी हा उपक्रम बंद केला.
यावेळी तालुक्यातील बहुसंख्य महिला भगिनींनी दिवसरात्र पाणीपुरवठा करणाऱ्या या टँकरचे चालक वाहक यांचा यथोचित सन्मान करून शुभेच्छा दिल्या. स्वखर्चातून जनतेची तहान भागविणार्या जलदूत जलदुत खरे यांच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक करीत जनतेने त्यांचे आभार व्यक्त केले.
नारळ फुटला आणि कंठ दाटला !
यंदा कडक उन्हाळा होता, मोहोळ तालुक्यातील अनेक गावं तहानली होती. घशाची कोरड घेऊन लोक आशेने प्रशासनाकडे पहात होती. कुणीही पुढं आलं नाही. लोकांच्या अशा संकटात राजू खरे नावाचा, माणूस पुढे आला आणि त्याने आपल्या खिशाला झळ लावत, एक दोन नाही तर तब्बल १४ टँकर दिले... हे टँकर पाणी घेवून लोकांच्या दारात जाऊ लागले, एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता तर दुसरीकडे, कृतज्ञतेचे पाणी लोकांच्या डोळ्यातून वाहू लागले होते, उन्हाळा संपेपर्यंत हे टँकर लोकांची तहान भागवत राहिले, आता पाउस झाला. मनमोकळेपणाने बरसला ,विहिरीला पाणी आलं, आटलेल्या बोअर सुरु झाल्या,लोकांच्या चेहऱ्यावर समाधान फुललं,आता टँकरच्या पाण्याची कुणालाच गरज नाही, त्यामुळे राजू खरे यांनी हे टँकर परत बोलावून घेतले. लोक म्हणू लागले, खरा पाणीदार माणूस कसा असावा ? तर तो राजू खरे सारखा. मोहोळच्या चंद्रमौळी गणेश मंदिरात या उपक्रमाची सांगता झाली, जनतेची तहान भागविणाऱ्या टँकर चालकांचा सन्मान, राजू खरे यांचे बंधू विजू खरे आणि परिवाराच्य वतीने सर्व वाहन चालक यांना मानाचा श्रीफळ,मायेची शाल पांघरून सत्कार करण्यात आला,लोक फक्त पहात होते,त्यांना खूप काही बोलायचं होतं पण शब्द मुके झाले होते.गणपतीला नारळ फोडण्यात आला आणि नारळाच्या पाण्यासोबत, लोकांच्या डोळ्यातही पाणी आले, डोळ्यातला एक एक थेंब, राजू खरे यांची कृतज्ञता व्यक्त करीत रहिला.
यावेळी प्रमुख उपस्थिती
विजुभाऊ खरे, नगरसेवक सिकंदर बोंगे, शिवसेना शहर प्रमुख विकी दादा देशमुख, नगरसेवक -चंद्रकांत गोडसे, नगरसेवक महादेव गोडसे, माजी ग्रामपंचायत सदस्य-आबा आंडगे,RPI सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष -तात्यासाहेब काळे,सुमित पवार गणेश सागर, बिट्टू देशमुख, अमृत सातपुते, दादाराव शिरसागर, किशोर बनसोडे सर,सर्फराज सय्यद, नगरसेवक अण्णा गवळी, उत्कर्ष मस्के, समजेस कारंडे, संतोष नरोटे, नजीक पिंपरी माजी सरपंच सुनील पाटील, अध्यक्ष संतोष बनसोडे,अरुण कदम उत्तर सोलापूर शिवसेना ता.प्रमुख उमाकांत करंडे, शिवसेना तालुका युवा प्रमुख उत्तर सोलापूर आकाश गजघाटे, सेवालाल नगर सरपंच लक्ष्मण राठोड, अध्यक्ष आवीनाश शिरसागर, बीबीदारफळ उपसरपंच नारायण सर्व गोड, ग्रामपंचायत सदस्य विजय साठे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख बजरंग देवकर, बीबीदारफळ ग्रामपंचायत सदस्य समाधान चौरे, शैलेश चौरे, नान्नज शिवसेना तालुका उपप्रमुख नंदकुमार गवळी, दादा गोरे, राम हिंगणी सरपंच संभाजी लेंगरे, हरवाडी सरपंच लिंगराज होनमाने, नेपाल गाव सरपंच पांडुरंग परकाळे बेगमपूर सरपंच प्रकाश सपाटे, काशिनाथ हाके, बुवा कोळी, संजय लंबे, वाफळे शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष जाधव, पांडुरंग तात्या डोंगरे,भिम टायगर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लखन घाटे,गणेश जाधव, नागनाथ बंडगर ,प्रकाश चव्हाण, विक्रम तीर्थे, खवणी तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम भोसले,संदीप घाडगे, दिनेश गुरव, जावेदभाई बोंगे. आदी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता