वडवळ श्री नागनाथ महाराज यांच्या चरणी नारळ अर्पण करून भीमा कारखाना निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील सभासद,शेतकरी,नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

प्रतिनिधी --- (विनोद पोतदार)
भिमा कारखाना हा शेतकऱ्यांचा कारखाना असल्यामुळे निवडणूक लादून कारखान्याच्या विकासला होणारा अडथळा व अर्थकारणाला होणारी अडचण टाळावी म्हणून मी हि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करीत होतो असे ते वडवळ येथे प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते. 
      मात्र काही लोकांनी राजकीय स्वार्थ साधण्यासाठी व व्यक्तिगत द्वेषामुळे विरोधाला विरोध म्हणून हि निवडणूक सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावर लादली आहे.भीमाच्या पहिल्या निवडणूकीत आम्हाला२५००मतांनी व  दुसऱ्या निवडणूकी वेळेस ५००० मतांनी निवडून देऊन आमच्यावर विश्वास दाखवला आहे.
     
       या निवडणुकीत सुध्दा आम्ही हॅटरीक साधारण  आहोत यासाठी मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा येथिल सभासद, शेतकरी सर्व पक्षीय नेते आमच्या सोबत आहेत तसेच तालुक्यातील द्वेषाचे व घाणेरडे राजकारण संपवण्यासाठी तसेच तालुकाचा व तालुक्यातील  शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, कामगार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि द्रूष्टप्रव्रुत्तीने राजकारण करून जनतेस वेठीस धरणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार असे प्रतिपादन भीमा कारखान्याचे चेअरमन खा. महाडिक यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या
निवडणुक निमित्ताने भीमा विकास आघाडी पॅनल प्रचाराचा शुभारंभ श्री नागनाथ महाराज यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
  

      याप्रसंगी व्यासपीठावर विजयराज डोंगरे जि.प.अर्थ व बांधकाम सभापती,उमेश पाटील राष्ट्रवादी प्रवक्ते,संतोष पाटील भाजपा, व्हा.चेअरमन सतिश जगताप,प्रभाकर भैय्या देशमुख,शैला गोडसे, विश्वराज महाडिक, चरणराज चवरे, मानाजी माने, रमेश बारस्कर, विनोद महाडिक,पवण महाडिक,विजय महाडिक, तानाजी गुंड,रामराव भोसले, पंडित निकम, शिवाजी गुंड, राहुल गुंड ,छगन. पवार आदी मान्यवर उपस्थित मंडळी उपस्थित होते . या प्रचार शुभारंभ प्रसंगी सर्व उमेदवार तसेच सभासद, शेतकरी वर्ग युवा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   
उमेश पाटील ---
म्हणाले की भिमा कारखाना निवडणूक लढवणार्या विरोधकांनी  
भिमा कारखान्यावरील मटेरियल नेऊन, लोकांची आर्थिक फसवणूक करुन स्व:ताचा लोकनेते  कारखाना उभा केला आणि हा कारखाना त्यांनी खाजगी केला.अशा लोकांना  सुज्ञ शेतकरी, सभासद नक्कीच त्यांची जागा दाखवून देतील असे ते म्हणाले. 

विजयराज डोंगरे ---
     यावेळी बोलताना म्हणाले कारखाना महाडिक  चांगल्या पद्धतीने चालवत आहेत परंतु नैसर्गिक आपत्तीत व राजकीय घडामोडी नंतर आर्थिक अडचणीत कारखाना आला तरी महाडिक यांनी शेतकरी हितासाठी अनेक अडचणतून मार्ग काढत  कारखान्यात एक्सपेंन्शन केलं  व दोन प्रकल्प उभा कले तसेच गाळप व्यवस्था सुरू ठेवला आहे.भिमा कारखाना आर्थिक अडचणीत व कर्जात  असल्याचा विरोधकांनी अपप्रचार करु नये व शेतकरी, सभासद यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये विरोधकांना योग्य ते उत्तर सभासद शेतकरी नक्की देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form