ठेवीदारास कारखान्याकडून १० टक्के द.सा.द.शे. दराने व्याज दिले जाईल व ज्यांना ठेव परत पाहिजे, त्यांनी तिन दिवस अगोदर कारखान्यास कळवावे
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ दिनांक १६.१०.२००२ रोजी सकाळी • ११.०० वाजता या शुभमुहूर्तावर मा. विरोधी पक्ष नेते आमदार श्री प्रविणजी दरेकर, आमदार श्री शहाजीबापू पाटील, श्री शेखर गायकवाड साखर आयुक्त, पुणे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच कलश पूजन कारखान्याचे संचालक श्री दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील म्हणाले की, गेल्या सिझनला कारखाना चालू झाला नाही, यावर्षी कारखाना पुर्ण क्षमतेने चालणार असून त्यासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून गळीतासाठी ३६,३१६ एकर ऊसाची नोंद झालेली आहे. त्यापासून अंदाजे १२ लाख मे. टनाचे गाळपाचे उद्दीष्ट आहे. २ ते ३ दिवसात तोडणी वाहतूकीचे सन २०२०-२१ ची थकीत रक्कम देणार असल्याचे त्यांनी सांगीतले. कारखान्यान्याचे आर्थिक नियोजन करून कर्जाची वेळेत परतफेड करणार आहे. सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपण पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी पार पाहण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही श्री अभिजीत पाटील यांनी केले. आपला कारखाना चालू करणेसाठी आ. श्री प्रविणजी दरेकर यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचे संचालक मंडळाच्या व सभासदांच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच पंढरपूर तालुक्याचे गतवैभव प्राप्त करणेसाठी हा कारखाना चालू करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार मानतो. तसेच तरुण शेतकरी युवकांना सभासद करून घेणेसाठी नवीन १५,००० शेअर्सची विक्री करणार असल्याचे सांगितले, कारखाण्याचा मागील सिझन बंद असल्यामुळे साखर उपलब्ध नसतांनाही बाहेरून विकत घेऊन सभासदांना दिपावली करण्यासाठी सवलतीच्या दरामध्ये साखर वाटप चालू केले आहे. कारखान्यास उभारी देण्यासाठी सभासदांनी आतापर्यंत कोटींच्या ठेवी दिल्या असून सभासदांनी आणखी ठेवी देण्याचे आवाहन केले. ठेवीदारास कारखान्याकडून १० टक्के द.सा.द.शे. दराने व्याज दिले जाईल व ज्यांना ठेव परत पाहिजे, त्यांनी तिन दिवस अगोदर कारखान्यास कळवावे, त्यांना त्याची ठेव परत केली जाईल असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे संचालक श्री तुकाराम मस्के सर यांनी केले, तर कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, समाधान काळे, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, तसेच एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे एम. डी. श्री अमर पाटील, मुंबई बँकेचे संचालक श्री विठ्ठलराव भोसले, साखर उपआयुक्त श्री संजयकुमार भोसले तसेच दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन व सिताराम कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजीराव काळुंगे सर व राजाराम सावंत, कारखान्याचे माजी संचालक, पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक उपस्थिती होते.