हजारो पत्रकार यांच्या साक्षीने पुणे येथे अधिवेशनाचा शानदार समारोप...
सद्य परिस्थितीत पत्रकारांनी अधिक सजग होण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे...
पुणे प्रतिनिधी---
लोकशाहीची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी चौथ्या खांबाची भूमिका मोलाची असून सद्य परिस्थितीत पत्रकारांनी अधिक सजग होण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंचवड- पुणे येथे केले. तर पत्रकारांनी बरं नव्हे तर खरं लिहिले पाहिजे असे सांगुन पत्रकार कोणत्याही पक्ष विचारांचा नसतो तो फक्त बातमीचा असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अध्यक्षीय समारोपात केले.
पुणे येथे शनिवार दिनांक १६ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित राज्यससतरीय अधिवेशनाच्या समारोप झाला.प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रात झालेल्या अधिवेशन समारोपला खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री, आमदार बच्चूभाऊ कडू, आमदार महेश लांडगे, आदी मान्यवरांची उपस्थिती झाला. उद्घाटन सकाळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव ,प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे,उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ, यांच्या उपस्थितीत झाले .समारोपाल कामगारांचे लढवय्ये नेते तथा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव , भोसरी मतदार संघाचे महेश लांडगे, शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे , आ. उमा खापरे,राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर,नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,चेतन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात AI चा शिरकाव पत्रकारांच्या बेरोजगारीत वाढ करणारा भासत आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे चैनल, यूट्यूब चैनल, डिजिटल माध्यम उदयास येत आहेत विविध माध्यमे आपापल्या पद्धतीने उत्तम रित्या सामाजिक प्रश्नांची मांडणी करत आहेत. हे करत असताना काही महत्वाच्या गोष्टीचे भान ठेवणे महत्वाचे आहे. पत्रकारांनी निष्पक्षपातीपणा, विश्वासार्हता टिकविणे अत्यावश्यक आहे.बातमी की जाहिरात या द्विधा संकटातूनही पत्रकाराला जावे लागते असे मत मांडले.
तर अमृतकाळातील माध्यम स्वातंत्र्य, भविष्य आणि पत्रकारितेतील राम’ या परिसंवादात प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव सहभागी झाले. अमृतकाळातील माध्यम स्वातंत्र्य, भविष्य आणि पत्रकारितेतील राम यावर चर्चा करताना माध्यमांना आज सर्दी झाली आहे का? आजचा निर्भिड पत्रकार कोण? पत्रकारांवर कोणकोणत्या प्रकारचे दबाव असतात? पत्रकारितेत युट्यूब महत्त्वाचा रोल निभावत आहे का? शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक यांचे प्रश्न माध्यम निष्पक्ष मांडतात का? यावर मान्यवरांनी आपली निर्भिड मते मांडली. हा परिसंवाद रंगतदार ठरला.
दुसऱ्या सूत्रामध्ये बोलताना प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे म्हणाले, सर्व जिल्ह्यातील पत्रकारांवरचे संघटन व्यापक निर्माण करून पत्रकार मजबुती देणे हा या अधिवेशनात्मक उद्देश आहे.यावेळी
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी विवेकवादी पत्रकारिता हिना कौसरखान,आश्वासन पत्रकारिता पुरस्कार रवींद्र आंबेकर,उत्कृष्ट पत्रकारिता दिनेश केळूसकर, युध्दवार्ता पत्रकारिता विनोद राऊत, आरोग्य पत्रकारिता संतोष आंधळे,प्ररणादायी पत्रकारिता सतीश नवले, अभिव्यक्ती पत्रकारिता सचिन चपळगावकर, कृषि पत्रकारिता विनोद इंगोले, जिजाऊ पत्रकारिता सुमित्रा वसावे, सद्रक्षणाय पत्रकारिता वैभव सोनवणे, आदर्श पत्रकारिता प्रविण बिडवे, एकलव्य पत्रकारिता प्रकाश बेळगोजी, शोध पत्रकारिता रोहित आठवले, उत्कृष्ट पत्रकारिता सागर आव्हाड, निर्भिड पत्रकारिता अमोल काकडे तसेच वाशिम रत्न पत्रकारिता निलेश सोमाणी,उत्कृष्ठ पत्रकारिता अमोल यलमार, उत्कृष्ट संघटक दशरथ चव्हाण (नवी मुंबई), नयन मोंढे (अमरावती), नितीन शिंदे (ठाणे), महेश पानसे (नागपूर), रमजान मन्सुरी (गुजरात), शिवाजी नेहे (गोवा), राजश्री चौधरी (दिल्ली), आरोग्य पत्रकारिता बाबा देशमाने, किशोर रायसाकडा (जळगाव), रोहिदास गाडगे (पुणे ग्रामीण), भूषण महाजन (जळगाव), शैलेश पालकर (रायगड), राजेंद्र कोरके (पंढरपूर), स्वामी शिरकूल (मुंबई), उपक्रमशील पत्रकारीता प्रभु गोरे (औरंगाबाद), वैभव स्वामी (बीड), आनंद शर्मा (नागपूर), प्रविण सपकाळे (जळगाव), प्रताप मेटकरी (सांगली),, प्रदीप शेंडे (नागपूर), आबा खवणेकर (सिंधुदूर्ग), पोपट गवांदे (नाशिक) यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व पत्रकारांना संघाकडून पत्रकारिते साठी उपयोगी डायरी , बॅग भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
या अधिवेशनास राज्यातील शहरी व ग्रामीण पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे, उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ, उपाध्यक्ष अतुल क्षीरसागर, महादेव मासाळ, सचिव जमीर सय्यद, कार्याध्यक्ष औदुंबर पाडूळे, खजिनदार मिलींद संधान तसेच अॅढ.संजय माने, योगेश गाडगे, विजय जगदाळे, विकास शिंदे, बेलाजी पात्रे, प्रमोद सस्ते, प्रसाद वडघुले, सागर झगडे,शशिकांत जाधव, प्रकाश लोखंडे, सुनील बेणके, संजय भेंडे, संदीप सोनार आदींनी केले.
सूत्रसंचालन अश्विनी सातव व अतुल क्षीरसागर यांनी केले.मिलिंद संधान, सागर झगडे यांनी आभार मानले आणि अधिवेशनाचा शानदार समारोप झाला. दरम्यान, अधिवेशनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण राज्यातून हजारो पत्रकारांची लावलेली हजेरी लक्षवेधून घेत होती.
Tags
सामाजिक वार्ता